At Sai Sneh Mind Healing and Wellness Center, we believe that true well-being begins with a balanced mind. Located in Pune, our center offers holistic mind-body healing through powerful techniques like Hypnotherapy, Counselling, Psychotherapy, NLP, Past Life regression, and Meditation-based therapies. We take a holistic approach to healing by addressing the root causes of emotional or psychological distress.
साईस्नेह माइंड हीलिंग अॅण्ड वेलनेस सेंटरच्या माध्यमातून कार्य करत असताना आमचा पूर्ण विश्वास आहे कि, खऱ्या आरोग्याची सुरुवात शांत,सकारात्मक, संतुलित, प्रसन्न आणि आरोग्यदायी मनापासूनच होते. कात्रज, पुणे येथे स्थित असलेले आमचे सेंटर हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी समर्पितपणे कार्य करते. येथे संमोहन उपचार (Hypnotherapy), मनोचिकित्सा (Psychotherapy), NLP, CBT, REBT, भूतकाळातील आठवणींचे निराकरण (Past Life Regression) आणि इतर मानसशास्त्रीय उपचार पद्धतीने लोकांना त्याच्या जीवनात समृद्ध होण्यास मदत करते.
खालील प्रकारचे त्रास किंवा यासारखे आणखी त्रास जाणवत असतील तर मानसिक आजार आहेत हे लक्षात घ्या. संमोहन उपचारांनी वेळीच यावर उपाय करा आणि तुमचं आनंदी आयुष्य पुन्हा मिळवा. तुमचा एक निर्णय तुम्हाला नव्याने तुमची ओळख करून देईल..!
कोणत्याही मानसिक समस्या या तुमच्या अंतर्मनात असतात.संमोहन उपचारांच्या माध्यमातून अंतर्मनातील भावनिक अडथळे, भीती, दुःख, मानसिक आजारांचे मुळ आणि जुन्या नकारात्मक सवयीं कायमस्वरूपी दूर होतात. तुमच्या अंतर्मनाच्या सामर्थ्याचा वापर आरोग्य राहण्यासाठी तसेच जीवनातील इतर समस्या दूर करण्यासाठी करता येते.
संमोहन उपचार केल्यानंतर मिळणारे सकारात्मक रिझल्ट्स हे दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी असतात. संमोहन उपचार केल्यानंतर त्याचे परिणाम असत्त्याने मिळत राहतात. पुन्हा समस्या निर्माण होणार नाहीत आणि झाल्या तरी त्यावर मात करण्याची मानसिकता खूप प्रबळ असते. त्यामुळे हे बदल आयुष्यभर टिकतात.
संमोहन उपचार हे तुमच्या आंतरिक समस्यांना मुळांसहित दूर करण्यास मदत करतात. मानसिक समस्यांमुळे निर्माण झालेल्या शारीरिक समस्याही आपोआप दूर होतात. ,मनोशारीरिक समस्या दूर करण्यासाठी संमोहन उपचार हे सध्याच्या काळात वरदान आहेत. खऱ्या अर्थाने मन आणि शरीर आरोग्यदायी बनतात.
संमोहन उपचारांच्या प्रत्येक सेशननुसार तुमच्या मानसिकतेत आणि वर्तनामध्ये अमुलाग्र सकारात्मक बदल होत जातात. मानसिक समस्या दूर होतात शिवाय तुमच्या दृष्टीकोन अधिक सकारात्मक , व्यापक आणि यशस्वी होण्यासाठी पूरक होतो. जीवनाचे ध्येय मिळते. ते साध्य करण्यासाठी आंतरिक प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळते.
संमोहन उपचार हि एक मानसशास्त्रीय उपचार पद्धती आहे. यात कोणत्याही औषधांचा आधार घेतला जात नाही. कोणत्याही प्रकारची पथ्ये किंवा मर्यादा नाहीत. सहज सोप्या पद्धतीने पण प्रभावीपणे परिणाम करणारी हि उपचार पद्धती आहे. या उपचारामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत.
संमोहन उपचार हे तुम्हाला जीवनाच्या सर्वच क्षेत्रात उपयुक्त ठरते. मानसिक त्रास दूर होतात शिवाय तुमच्या कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीतसुद्धा संमोहन उपचारांचा तुम्हाला फायदा होतो. आरोग्य उत्तम राहते. जीवनमान सुधारते. नातेसंबंध सुधारतात.आर्थिक प्रगती साधता येते.
व्यक्तीच्या मानसिक त्रासांचे वैज्ञानिक निदान केले जाते. व्यक्तीला होणारे भावनिक वेदना, मानसिक ताण आणि मनात दडलेल्या समस्या इथे मुळापासून समजून घेतल्या जातात. आमच्या इथे प्रत्येक उपचार वैयक्तिक आहे. किमान सहा सेशन्स दिले जातात. आवश्यकतेनुसार सेशन्स वाढतात. इतरत्र एक शेषन दिले जाते, त्याच उपचार शुल्क मध्ये सहा सेशन्स आम्ही देतो. जे अतिशय आवश्यक आहे.
आम्ही तुमच्या समस्या समजून घेतो, त्यावर योग्य निदान करतो.
निरंतर चिंता, तणाव, भीती, राग किंवा दुःख यामुळे मन सतत नकारात्मक मानसिकता राहते. त्यामुळे रोजच्या जीवनात अनेक इतर समस्याही निर्माण होत राहतात. खालील समस्या शिवाय इतर मनोशारीरिक त्रास दूर करण्यासाठी आजच संपर्क करा.
संमोहन उपचाराने या समस्या दूर करा :
संमोहन उपचार घेवू कि नको? आता घेवू कि काही दिवसांनी किंवा महिन्यांनी घेवू? इतके उपचार करून झाले, खरचं आता फायदा होईल का? माझं आयुष्य पूर्वीप्रमाणे होईल का? मला काय करावे कळत नाही आहे? असे प्रश्न तुम्हाला संमोहन उपचार घ्यावेत कि नाही हा विचार करताना पडतील. संमोहन उपचारतज्ञ म्हणून आणि सुमारे सतरा वर्षांचा अनुभव पाहता मी हे सांगू शकतो कि तुम्ही सकारात्मक निर्णय घ्या, संमोहन उपचार आवर्जून घ्या. तुमच्या समस्या, मानसिक त्रास तर दूर होतीलच पण मानसिक, शारिरी आणि भावनिक या तिन्ही पातळ्यांवर तुम्ही आरोग्यदायी बनाल. कौटुंबिक, व्यावसायिक, करिअरविषयक, व्यक्तिमत्व संबंधित, नातेसंबंध आणि आर्थिक असे सर्वच बाबतील सकारात्मकरित्या आयुष्य बदलून जाईल.
आताच निर्णय का घ्यावा :
संमोहन उपचार हे एक वरदान आहे. 2020 कोव्हीड साथीनंतर लोक मानसिक आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. तुम्ही अजूनही कळत आहे पण वळत नाही अशा अवस्थेत राहून दुर्लक्ष करू नका. मानसिकरीत्या सक्षम व्हा, जीवनाचा आनंद मिळवा. वेळ वाया घालवणे हा सुद्धा विकाराच आहे नाही का? .
तुमच्या मनात खोलवर रुजलेल्या नकारात्मक विचार, भावना, धारणा आणि सवयींना कायमस्वरूपी अगदी मुळासकट दूर करा. तुमचं मन आणि शरीर निरोगी असणे हीच खरी श्रीमंती आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना मनाचे आरोग्य उत्तम ठेवायलाच पाहिजे. आताच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. तुमचं आणि तुमच्या सभोवतालचे आयुष बदलून टाका.
माझ्यासाठी हा माझे जीवन बदलणारा अनुभव होता. मी खूप तणावात होते. वारंवार चिंता आणि निद्रानाश यामुळे मी खूप निगेटिव्ह बनत होते. संमोहन उपचारद्वारे, मी मानसिक त्रासांतून पूर्ण बरी झाली आहे. आता मला जाणवणाऱ्या चिंता, भीती, निद्रानाश, राग या समस्या आता नाहीश्या झाल्या आहेत. धन्यवाद, मल्हार सर आणि साई स्नेह वेलनेस सेंटर.
माझं मानसिक आरोग्य खूपच बिघडलं होतं. सतत नकारात्मक विचार, भीती आणि अकारण घाबरणं हे माझं रोजचं आयुष्य झालं होतं. झोप लागायची नाही, मन सारखं अस्वस्थ राहायचं. कामात लक्ष लागत नव्हतं आणि घरच्यांशीसुद्धा चिडचिड वाढली होती.साई स्नेह वेलनेस सेंटरमध्ये मल्हार सरांकडून संमोहन उपचार घेतले. पहिल्याच सेशनपासून मनात शांतता जाणवायला लागली. हळूहळू मन स्थिर झालं, आत्मविश्वास परत आला आणि झोप सुधारली. आता मी आनंदी, शांत आणि सकारात्मक जीवन जगतो आहे. त्यासाठी मनापासून धन्यवाद, मल्हार सर!
मी कायम कामाच्या तणावात असायचो. डोकं शांत नसायचं, चिडचिड वाढलेली होती. झोपही लागायची नाही. साई स्नेह वेलनेस सेंटरमध्ये संमोहन उपचार घेतल्यानंतर माझं आयुष्यच बदललं. आता मी शांत, सकारात्मक आहे आणि माझा आत्मविश्वास प्रचंडवाढलेला आहे. एकदातरी संमोहन उपचार घ्यायला हवेत हे का म्हणतात मला समजले. मनापासून धन्यवाद, मल्हार सर!
सतत चिंता, झोप न लागणे आणि मन अस्वस्थ असणं यामुळे माझं वैयक्तिक आयुष्यही बिघडलं होतं. साई स्नेह वेलनेस सेंटरच्या मार्गदर्शनामुळे आणि मल्हार सरांच्या संमोहन उपचारांमुळे मी मानसिकदृष्ट्या सशक्त झाले आहे. मी आता समाधानी आणि स्थिर जीवन जगते.
माझी लोकांमध्ये बोलायला फार भीती वाटायची. नवीन ठिकाणी गेलं की घसा सुकायचा, हृदय जोरात धडधडायचं. मी लोकांपासून दूर राहायला लागलो होतो. मित्रांच्या सल्ल्याने साई स्नेह वेलनेस सेंटरमध्ये संमोहन उपचार घेतले. हळूहळू भीती कमी झाली, मन शांत झालं, तणाव कमी होत गेला आणि माझा आत्मविश्वास वाढला. आता मी मोकळेपणाने बोलतो आणि लोकांमध्ये सहज मिसळतो. हा मी घेतलेला खूप योग्य निर्णय होता. सर म्हणतात तसे मानसिक आजारांचा विळखा वेळीच ओळखला पाहिजे.
माझं सारखं हात धुणं, गोष्टी बारकाईने तपासणं थांबतच नव्हतं. OCD आहे असे मला सांगण्यात आले. खूप औषधउपचार करत होते. कधी कधी बरे वाटायचं पुन्हा तसचं होत होते. मनात कायम भीती असायची की काहीतरी चुकीचं होईल. हे सगळं खूप त्रासदायक झालं होतं. मल्हार सरांचा पेपर मधील लेख वाचून मी साई स्नेह वेलनेस सेंटरमध्ये संपर्क केला, संमोहन उपचार घेतले. हळूहळू ती भीती गेली, विचार शांत झाले. आता मी मोकळेपणाने आणि आनंदाने आयुष्य जगते आहे. मला माझ्या मनावर , विचारांवर नियंत्रण मिळवता येत आहे. मनापसून सरांचे आभार.
व्यावसायिक
जवळजवळ दीड ते दोन वर्षे मी सततच्या भीती, नकारात्मक विचार, झोपेचा त्रास आणि मानसिक अशांतता अशा त्रासात अडकलेलो होतो. छोट्या गोष्टींचाही मोठा ताण यायचा, लोकांमध्ये बोलायला भीती वाटायची आणि मन कायम थकल्यासारखं वाटायचं. उपचाराच्या शोधात मला संमोहन उपचार विषयी माहिती झाली. साई स्नेह वेलनेस सेंटरमधून मल्हार सरांकडून संमोहन उपचार घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच सेशननंतर बदल जाणवायला लागला.मन हलकं, शांत आणि स्थिर झालं. सरांचे प्रत्येक सेशन म्हणजे एक वेगळा अनुभव होता.सरांचे व्यक्तिमत्वचं तुम्हाला अर्धे बरे करते,हा माझा अनुभव आहे. उपचारानंतर मी आत्मविश्वासाने, आनंदाने आणि सकारात्मकतेने जगतोय. खरंच, संमोहन उपचारांनी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आहे. तुम्ही फक्त विचार करू नका. संमोहन उपचार घ्या आणि आनंदी रहा. असेच सांगेन..!
© 2025 · Sai Sneh Hospital & Diagnostic Centre Pvt. Ltd Pune· All Rights Reserved.